कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी : चंद्रकांत पाटील

Updated : 20 May 2020 03:27 PM (IST)
राज्यातील कोरोनाच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झालेत. लॉकडाऊनच्या काळात भाजपनं सरकारविरोधी आंदोलनाची हाक दिलीय. २२ मे रोजी भाजपच्या वतीने मेरा आंगन मेरा रणांगण’ महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत भाजपकडून हे आंदोलन करण्यात येईल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.